नागपूर इथली दिलदारी

नागपूर इथली दिलदारी

मंडळी ! खऱ्या नागपूरी व्यक्तीची दिलदार वृत्ती ही सर्वश्रुत तर आहेच ,

जगप्रसिद्ध पण आहे ! पुल यांनी आपल्या " तुम्हाला कोण व्हायचं आहे, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर ' यात( व्हिडिओ यूट्यूब वर

उपलब्ध) याचा मजेशीर आढावा घेतला आहेच ! यात ,त्यांनी नागपूरी

वडाभात ,पान आणि संत्री यांचा उल्लेख तर केलेला आहेच ,पुढे असे

पण म्हंटले आहे की एखादा नागपूरी,

दुसऱ्या शहरात जाऊन ,तिथल्या

परिचितांना ,उन्हाळ्यात आपल्या

नागपूरात यायचे आग्रही आमंत्रण

देतो ," संत्री खाऊ आणि वाळ्याच्या

तट्यात पडले राहू' असे सांगून आपली दिलदारी सिद्ध करतो ! असो.

हे थोडं विषयांतर झालं !

 

 

---गोष्ट ७० च्या दशकातली. आमचे

बल्लूकाका ( वडिलांचे काका,माझे

आजोबा) ,वंजारीनगरला रहात.त्या

वेळी माझा आतेभाऊ पण पदव्युत्तर

शिक्षणासाठी नागपूरला आलेला होता. तर आमच्या बल्लूकाकांना

एक आगळी सवय होती. घरी काही

खास बेत असला की त्याचा आस्वाद,

चार-चौघांना बोलावूनच घ्यायचा ! त्या

मुळे ,थंडीच्या दिवसात , कधी घरी

गाजर हलवा किंवा मटार कचोरी असा

बेत असला की आमंत्रण यायचे आणि

आतेभाऊ ,मी लगेच ३९ नंबर बस

( अयाचित मंदिर - रामेश्वरी नगर)

पकडून ,वंजारीनगर गाठत असू !

---आमचे एक दूसरे काका पण याच

पठडीतले. कधी-मधी त्यांना आपल्या

दिलदारीची झलक पेश करायची हुक्की येते असे ! मग काय ,ऐन

हिवाळ्यात , श्रीखंड ,पीठाची वडी

असा बेत अन् २५-३० मित्रांना घरी

येण्याचे आमंत्रण ! तेव्हा , श्रीखंड

तयार करायची पद्धत पण अफलातून ! प्रथम ,दही मंडीतून

दह्याचे पिंप (टिन) घरी येणार,मग

एका खाटेवर (बाज) धोतर टाकून

हे दही त्यावर पसरवून चक्का तयार

होणार आणि त्याचे श्रीखंड ! अर्थात,

आम्हाला आमंत्रण असायचेच !

आता बराच बदल झालेला आहे.तरी

आपल्या माहितीत असे ,दिलदारीचे

किस्से ,असतीलच ना ?

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *