लक्षात येतं ! ७० च्या दशकात, ७-८ वर्ष ,माझा पण ,याच क्षेत्रात , मुक्त संचार होता. आज दुपारी, असाच
बसलो असताना काही आठवून गेले,जे इथं देण्याचा मोह,मला आवरता आला नाही! वही पेश है :
महाल एरिया चे एकंदर स्वरूप" क्या नहीं मेरे पास ' म्हणजेच सर्वसमावेशक
असेच राहिले आहे, तेव्हा आणि आता ही ! याच विषयावर अजून बोलायचे झाले तर ,इथं वाॅकर रोड आहे, कोटी रोड आहे आणि केळीबाग रोड सुद्धा ! इथं रिसालदार गल्ली, पेटकर गल्ली आणि आबदेव गल्ली पण आहे. नंतर चिटणवीसपुरा आणि नवाबपुरा पण इथलेच ! चिटणीस वाडा ,गुजर वाडा तसेच सोनोबाची वाडी पण यातच येते. नरसिंग,राजविलास, नटराज, शाम, चित्रा ही चलचित्रपट गृहं पण इथलीच.
नंतर ,,बडकस चौक , झेंडा चौक सुद्धा याच भागातले ! एक प्रश्न मात्र असा उपस्थित होतो की
या महाल एरिया ची व्याप्ती ,आवाका नेमका किती, म्हणजेच याच्या सीमारेषा त्या कोणत्या ? तसं पाहिलं तर , केळीबाग रोड वरून,बडकस चौक ओलांडून पुढे गांधी पुतळा , यानंतर इतवारी सुरू. इकडे झेंडा चौक , पुढे नाग नदी पूल आणि जूनी शुक्रवारी ओलांडली की रेशीमबाग सुरू. जाणकारांनी ,या विषयावर , जरूर
माहिती पुरवावी !
टीप- वर आलेली काही नांव आता
बदलली आहेत पण आमच्या
सारख्यांना ,सरोजच आठवणार,
सुदामा नाही
असेच