मंडळी ! काय असतं की कुठल्या तरी गावात किंवा शहरात ,आपल्या वास्तव
दरम्यान आपण काही दुकानं किंवा सेवा केंद्र यांना नेहमी जात असतो ,म्हणजेच ती आपली लागलेली
असतात आणि बराच काळ लोटला तरी ती आपल्याला छान लक्षात राहतात ,नाही का ? चला ,७० च्या दशकातली ,माझी अशीच काही ठिकाणं , यांना , फिरून एकवार,
जाऊन येऊ !
---आंबेकर लोणी आणि तूप: हे दुकान, केळीबाग रोड वरचे ,इथं महिन्यात एक चक्कर तरी होई ,लोणी
आणायला. आजी ते कढवून तूप
करीत असे.
मुकुंदराय केमिस्ट- हे ऍलोपेथी औषध दुकान , नरसिंग टाॅकीज - टिळक पुतळा रोड वर होते. अन्
आजोबांची औषधं आणायला ,इथं जात असे. एक स्थूल,टक्कल पडलेले
गृहस्थ ,धोतर आणि सदरा घातलेले
समोर असायचे.
---आग्रा भंडार - महाल भाजी बाजार
बाहेर ,हे दुकान होते, आपल्या खवा
जिलेबी करिता प्रसिद्ध ! त्यामुळे, आत्या , पुण्याहून आली की इथली भेट
ही ठरलेली !
---राम भंडार (बडकस चौक): आपल्या केशरी पेढे (( वेलचीची चव
असलेले) साठी अधिक मशहूर ! त्यामुळे,प्रसादाला पेढा तो इथलाच !
--डाॅ. भोयर यांचे होमिओपॅथी क्लिनिक: हे अयाचित मंदिर - नटराज
टाॅकीज रोड वर होते. तेव्हा डाॅक्टर साहेब,आसपासच्या एरियात फार
प्रसिद्ध होते आणि इथं नेहमी गर्दी
असायची. सखोल विचारणा करूनच
ते औषध देत !
वरील लिखाणामुळे , काहींच्या अश्याच आठवणी जाग्या झाल्या
असतील ना ?