कुछ यादें ,बीते दिनों की !
मंडळी ! या आठवणींची काय गंमत असते पहा! तुमचे मन जरा निवांत झाले की ह्या लगेच मनाभोवती फेर धरतात, नाही का ? परवा, असाच बसलो असताना, ७० घ्या दशकातले
माझे नागपूर वास्तव्य आणि त्यातील काही गोष्टी, अवचित आठवून गेल्या ! चला, तुम्हाला पण ती सफर घडवून आणतो ! मुख्य गोष्ट म्हणजे ,त्या काळी अगदी साऱ्यांकडे वेळ असायचा ! अन्
मनोरंजनाची साधनं विचाराल तर ,घरात वाचन आणि रेडिओ तर बाहेर ,फिरणं आणि सिनेमा ! याच
कारणांमुळे , मंडळी ,स्त्री असो वा पुरूष ,एकामेकांकडे बसायला जाणे ही प्रथाच होती. यामुळे , वेळ तर छान जायचाच , विचारपूस पण होऊन जायची. ---विद्यार्थी असो किंवा नोकरदार , आज जितके व्यस्त असतात तेवढे नसायचे ! नोकरी काय तर १० ते ५ आणि विद्यार्थी म्हणजे फक्त शाळाच काय ती रहात असे - ट्यूशन , कोचिंग इ प्रकार अद्याप सुरू व्हायचे होते !प्रत्येकाचेच पायी फिरणे फार व्हायचे. जवळपासची सारी कामं ही पायीच निपटवली जायची , अंतर अधिक असेल तर सायकल ! त्यामुळे
वेगळी अशी चालायची कवायद करावी लागत नसे ! -- लहान मोठे घरगुती समारंभ हे घरीच साजरे होत असत आणि या निमित्ताने घरी, बऱ्याच लोकांचं येणं होत असे. या प्रसंगी , आवश्यक ती पाकसिध्दता
घरच्या महिला लीलया ,पार पाडीत ! ---त्या जमान्यात म्हणून ७० घ्या दशकात,वेटाळात ,लॅंडलाईन फोन अगदी मोजक्या घरातच असे अन् तुम्ही त्यांचा नंबर कुणाला दिला असेल तर , फोन आला की तुम्हाला बोलावणे येत असे किंवा निरोप कळविला जाई ! प्रत्येक घराचा एक फॅमिली डॉक्टर रहा असे,मग ते ऎलोपेथी चे डाॅक्टर इंदापवार ,बोधनकर ,कोतवाल किंवा तत्सम असोत , होमिओपॅथी चे डाॅ.
भोयर असोत किंवा वैद्य धर्माधिकारी असोत ! घरातील साऱ्यांची दुखणी हेच बरी करीत !
एकंदर पहायला गेलं तर , जिंदगी काफी सुकून भरी आणि समाधानाची नाही का ? मागे वळून पाहिलं की हेच जाणवतं की: जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकां , वो फिर नहीं आते ..उरतात ,त्या फक्त आठवणी! खरं ना ?