आम्ही धरमपेठ शाळेत 1960 ते 1970 पर्यंत होतो, पहिली ते दहावी... Lower matric, SSC
पहिली ते चौथी....... आम्ही मित्र सकाळी पायी पायी दफ्तर हातात घेऊन शाळेत जाणार, जाताना आई नीट जा रे बोलणार. That's all... कोणी घराच्या बाहेर पण सोडायला येणार नाही, No bye bye, miss you, flying kisses काही नाही.
आमच्या वेळी मधल्या सुटीत शाळेच्या बाहेर चुरण, बोरं, पेरू आणि ice fruit ची गाडी, आणि बोरकुट. 5 ते 10 पैशात या पैकी काहीतरी मिळायचं, अरे विसरलो उकडलेले बोरं... हे तर पकवान्ना आमच्या करिता...
एका पेपरात बोरं किंवा बोरकुट, त्या मधे पण जवळच्या मित्रां मधे share करणार, आपापले बोरं खात कोणी बसलाय असं व्हायचं नाही कधी, ही एकी होती, भांडण पण होणार, पण मनात काही नाही.
शाळेत शुक्रवारी पूजा असायची, तेव्हा आम्ही मुरमुरे, पोहे, फुटाणे आणायला बाहेर जाणार, किती मजा त्या छोट्याशा समारंभात.
फार अल्पसंतुष्टी होते सगळे, कुणा बद्दल द्वेष नाही, निखळ मैत्री....
शाळेचा गणवेष, खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट, दोन जोडी मॅक्सिमम..... रविवारी धुणार आणि दोन्ही जोड शनिवार पर्यंत घालणार. तेव्हा शाई चे पेन होते, खिशामध्ये लीक झाला की डाग पडायचा, पण कुठे लिंबू लाव, साबण म्हणजे बहुतेक sunlight असणार..... खूप घासावं लागायचं तेव्हा डाग निघणार.
एक कंपास पेटी असायची, त्यात पेन, HB ची पेन्सिल, खोड रबर, कंपास इतकं नक्की असणार.. रबर पेन्सिल आणि शाईचे, वेगवेगळे होते... किंवा एकच.. एका बाजूला लाल आणि दुसऱ्या बाजूला निळं बहुतेक....
पायात निळी स्लिप्पर.... अंगठा तुटला की बहिणी कडून seftypin घेऊन लावणार, नवीन स्लिप्पर मिळत नव्हती लगेच....
नवीन पुस्तक आणि वह्यांना ब्राउन रंगाचे कव्हर लावणे, एक मोठा कार्यक्रम, त्यावर नाव, तुकडी लिहणे *आजकाल च्या मुलांना कळणार नाही तुकडी म्हणजे*
अश्या गमती जमती, अभ्यास करणार, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा 3 परीक्षा. मजा यायची, 60% टक्के म्हणजे पोरगा हुशार, 75% म्हणजे लई हुशार......
असो, देवाच्या कृपेने शाळा ऊत्तम होती आणि खूप खूप धन्यवाद मास्तरांना ज्यांनी आम्हाला शिकवलं आणि शिक्षणाचा पाया मजबूत केला.
अशा प्रामाणिक सरांना आदर पूर्वक नमस्कार आणि आभार...
शेवटी शाळा.. काय बोलणार मित्रांनो, पन्नास वर्षांनी गेलो, 2020 साली,शाळेच्या दरवाज्यावर डोकं ठेवलं, खूप बरं वाटलं, समाधान वाटलं