आमच्या नागपूरला कोणी कोणाला सरळ नावाने हाक मारत नाही (हे पण नागपुरी ).. म्हणजे गिरीशला गिऱ्या, सतीशला सत्या, मंगेशला मंग्या, मिलिंद ला मिल्या वगैरे.....
आणि ह्याहून गंम्मत म्हणजे ज्यांचे नाव 4 अक्षरी आहे, त्यांना एक तर टोपण नावे आहेत, अविनाश ला बंटी, गजानन ला गजा, प्रभाकर ला पभ्या....
आम्ही बंटी ला मात्र टिम्ब म्हणायचो
असो, हे सोडा, नागपूरकरांनी देवाला पण सोडले नाही, राम ला राम्या तर कृष्णाला किसन्या किंवा कान्हा.....
आता वडिलांकडे वळू या, तसे 80 ते 85& टक्के बाबाच म्हणतात... हे मी 50/60 वर्षा पूर्वीच म्हणतोय. तरी आमच्या कडे भाऊसाहेब, अण्णासाहेब, दादा, काका, अप्पा म्हणायची पद्धत होती. माझा मित्र वडिलांना अण्णासाहेब म्हणायचा, तर आम्ही पण आईला बाई म्हणायचो.
आता सुद्धा बरं नसेल तर आईगं येत, ते सोडा...
आई ला माई, बाई, मावशी, अक्का म्हणणारे खूप.....
अशी ही गंम्मत, पण खरी गंम्मत आता सुद्धा एखादी मैत्रीण सतरीला आलेली काय विद्या कसा आहे, विचारते तेव्हा अंगाला शहारा येतो....