मंडळी ! या जुन्या आठवणींची काय गंमत असते पहा ! आपल्याला थोडा निवांत वेळ मिळाला रे मिळाला की या
मनात फेर धरतात ! साल २०२४ च्या
प्रारंभी , माझ्यासोबत असेच घडले. आज तेच, थोडक्यात, ७० च्या दशकात,एक फेरफटका !
---त्या काळी,जवळपास जायचे असल्यास पायीच आणि पल्ला लांबचा
असेल तर सायकलीनं असा प्रघात होता. काॅलेज शिक्षणासाठी जेव्हा
जून १९७० मधे मी नागपूरला आलो तेव्हा आजीचे बंधू म्हणजे आमचे
दंताळे मामा हे ,DAAPT तून नुकतेच निवृत्त झाले होते आणि त्यांनी मला आपली BSA २४ इंची सायकल देऊ केली अन् माझी छान सोय केली. मग,
मोहतात , जुनी शुक्रवारी, सक्करदरा चौक ,असे जाणे हे सायकल वरूनच
होत असे. नंतर PGTD कॅंपसला
सुद्धा जाणे , टिळक पुतळा, लोखंडी पूल,बर्डी मेन रोड, लाॅ काॅलेज, भरत
नगर ,करीत सायकलनीच ! दंताळे मामा हे लक्ष्मीनगर LIGH काॅलनी,
पाणी टाकीसमोर रहायचे . तिथं गेलो
की सायकल वरून परतीचा प्रवास हा
धरमपेठ, बर्डी असा न करता ,अंध
विद्यालय ,रहाटे काॅलनी , रामकृष्ण
आश्रम , धंतोली , ग्रेट नाग रोड,ऊंटखाना,लोकांची शाळा,नाग
नदी पूल , चिटणवीसपुरा असा होत असे !
-- याच काळात ,शहर बस सेवा यांच्या
रूट क्रमांक १ आणि २ , अयाचित मंदिर ते श्रद्धानंद पेठ , यातून भरपूर
प्रवास घडला. ती खरं तर एक- दीड
तासांची आनंदयात्रा च असायची ! ही
बस , नटराज , नरसिंग , जयश्री , आनंद,श्री ,व्हेरायटी टाॅकीज समोरून
जायची व पोस्टर वरून ,कोणता सिनेमा लागला आहे,हे कळायचे ! लोखंडी पूल - आनंद या मार्गावर,
डावीकडे ,शनि मंदिर पण लागायचे,जे
चांगलेच स्मरणात आहे. अया. मंदिर -
श्र. पेठ ,तेव्हा तिकिट किती पडत असे
हे आता आठवत नाही. नंतर पुणे,
भोपाळ अश्या शहरी पण बस प्रवास
घडला पण ती मजा काही आली नाही !
--- ७० च्या दशकात, तिथं थंडी विशेष
जाणवली नाही, याबद्दल मागे लिहिले
आहेच. आता बात उन्हाळ्याची ! नागपूर उन्हाळा याबद्दल बरीच चर्चा
इतर शहरीय करत असतात आणि त्याला घाबरतात पण ! खरा नागपूरी
मात्र कधीच असे भय बाळगत नाही! या मोसमात , बाहेर पडतांना कान आणि डोकं व्यवस्थित झाकले , डोळ्यांत गाॅगल आणि खिशात कांदा ठेवला की भागून जात असे. आल्यावर
कैरीचे पन्हे रहायचं ; कधी ऊन बाधलं
तर रात्री , तळपायाला कांदा रस चोळणे आणि विषय संपत असे, नाही का ? याच अनुषंगाने,मला आमची
बी एससी फायनल परीक्षा नेहमीच
लक्षात राहील कारण हे महिना , सेंटर
मेडिकल कॉलेज आणि. वेळ दुपारी
२ ते ५ !
तो ये थीं , नागपुर की कुछ पुरानी यादें ! या पावभाजी आणि पिझ्झाच्या
जमान्यात ,आमच्यासारख्यांना , अजूनही ,काकडीचे थालिपीठ आहे
लौकीचे मुटकुळे आठवतात , काय करणार ?